खरीप पीक विमा 2025 आणि आंबिया बहार फळ पीक विमा 2024-25 : महत्त्वाचे अपडेट

राज्यातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून खरीप पीक विमा 2025 च्या प्रतीक्षेत होते. याबाबत कृषी विभाग आणि कृषिमंत्र्यांच्या माध्यमातून वारंवार आढावा बैठक घेण्यात आल्या होत्या. विविध शेतकरी संघटनांनीही निवेदन देऊन पीक विमा लवकर वितरित करण्याची मागणी केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर आता पीक विमा वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याची … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय : दोन लाखांपर्यंत पीककर्ज माफी जाहीर

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” अंतर्गत महत्त्वाचा निर्णय घेत दोन लाख रुपयांपर्यंत पीककर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती देत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयानुसार ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीककर्जावर ही कर्जमाफी लागू होणार आहे. … Read more

पीएम किसान योजनेतील लाभासाठी ई-केवायसी व आधार सीडिंग अपूर्ण; हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी तब्बल २ हजार ९८१ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप प्रलंबित असून, ३ हजार ८२७ शेतकऱ्यांचे आधार सीडिंग (DBT Enable) पूर्ण झालेले नाही, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. ई-केवायसी व आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्यापासून वंचित राहावे … Read more

घरकुल लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी: 190 कोटी रुपयांचा निधी मंजूर, 50 हजारांचा अतिरिक्त हप्ता मिळणार

ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत मंजूर घरकुलांचे अर्धवट बांधकाम निधीअभावी रखडले होते. मात्र आता शासनाने नवीन तीन शासन निर्णय (GR) जाहीर करून एकूण 190 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी 50,000 रुपये अतिरिक्त राज्य हिस्सा जमा होणार आहे. 📅 शासन निर्णयाचा तपशील … Read more

खरीप पीक विमा 2025 : नुकसानभरपाई तात्काळ देण्याचे निर्देश

राज्यातील खरीप पीक विमा 2025 चा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून, मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांकडून सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनातही या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय … Read more

आता गावची चावडी थेट मोबाईलवर: जमिनीचे फेरफार, मोजणी व कोर्ट नोटिसा ऑनलाईन पाहण्याची सुविधा

पूर्वी गावातील एखादी जमीन विक्री, फेरफार, मोजणी किंवा कोर्टाशी संबंधित नोटीस असेल तर ती चावडीवर कागद चिकटवून जाहीर केली जात असे. तलाठी व कोतवाल यांच्या माध्यमातून ही माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचायची. मात्र बदलत्या काळात वेळेअभावी अनेकांना चावडीवर जाणे शक्य होत नाही. हीच गरज ओळखून शासनाने “आपली चावडी” ही सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे. काय पाहता … Read more

वन्यप्राण्यांमुळे पीक व फळबागांचे नुकसान : शेतकऱ्यांना 30 दिवसांत नुकसानभरपाई, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

राज्यात वन्यप्राण्यांमुळे रबी पिके, ऊस तसेच विविध फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन व वनविभाग यांच्या माध्यमातून नुकसानभरपाई दिली जाते. यासाठी स्वतंत्र ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवण्यात येत आहे. 💰 नुकसानभरपाईचे दर (ठळक मुद्दे) 🌴 फळबागांसाठी 🌾 शेती पिकांसाठी 🌱 ऊस 📝 अर्ज कसा कराल? (ऑनलाईन प्रक्रिया) नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आरटीएस (RTS) … Read more

लाडकी बहीण योजनेचा डबल हप्ता जमा; 12 जिल्ह्यांत आजपासून 3000 रुपये वर्ग

राज्यातील लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा डबल हप्ता (₹3000) थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. होळी आणि महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ही मोठी भेट सरकारकडून देण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, राज्यातील सुमारे 2 … Read more

वरखेडच्या जिल्हा परिषद शाळेची भरारीएनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत २७ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; गुणगौरव सोहळा उत्साहात

तालुक्यातील वरखेड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक आदर्श शाळा या शाळेने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेत शाळेचे तब्बल २७ विद्यार्थी पात्र ठरले. याशिवाय दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेतील मुलाखतीपर्यंत मजल मारली. या ऐतिहासिक यशाच्या पार्श्वभूमीवर शाळेत … Read more

🔴 पीएम किसान सन्मान निधी – 22वा हप्ता | उशीर होण्याची शक्यता? आजचे महत्त्वाचे अपडेट

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याच्या वितरणाबाबत सध्या संभ्रमाची स्थिती निर्माण झालेली आहे.आतापर्यंत कुठल्याही शासकीय किंवा अधिकृत सूत्राकडून हप्ता वितरणाची निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. 24 फेब्रुवारी, 28 फेब्रुवारी किंवा होळीपूर्वी हप्ता मिळेल अशा अनेक तारखा प्रसारमाध्यमांमधून सांगण्यात आल्या,मात्र या सर्व तारखा अनधिकृत असून शासनाकडून त्यावर कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. 🔔 28 … Read more