राज्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 2444 ग्रामपंचायतींमध्ये 3571 रिक्त जागांसाठी मतदान

मुंबई, 21 मार्च 2026 – महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी राज्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. 17 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, राज्यातील 34 जिल्ह्यांतील 2444 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 3571 रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये 471 थेट सरपंच पदे आणि 3120 सदस्य पदांचा समावेश आहे. ही निवडणूक मृत्यू, राजीनामा, अपात्रता किंवा … Read more

खरीप पीक विमा 2025-26 : कॅल्क्युलेशन सुरू, पण अनेक ठिकाणी संभ्रम

राज्यात खरीप पीक विमा 2025-26 संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पीक विम्याच्या रकमेचे कॅल्क्युलेशन दिसायला सुरुवात झाली आहे, तर काहींना अजूनही “Calculation Awaited” किंवा 0 (शून्य) रक्कम दाखवत आहे. त्यामुळे “आपल्या जिल्ह्याला पीक विमा मिळणार का?” हा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. 📊 कॅल्क्युलेशन कशावर ठरते? पीक विमा मिळण्याचा सर्वात महत्त्वाचा … Read more

चिखलीत ‘शिंदे हॉस्पिटल’च्या नवीन इमारतीचे स्थलांतर; आज होणार उद्घाटन सोहळा…. आज होणार उद्घाटन सोहळा….

चिखली (प्रतिनिधी) : चिखली शहरातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा देणारे ‘शिंदे हॉस्पिटल’ आता नव्या आणि आधुनिक इमारतीत स्थलांतरित झाले असून या नव्या वास्तूचा भव्य उद्घाटन सोहळा आज, सोमवार (१६ मार्च २०२६) रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. अत्याधुनिक सुविधा आणि अद्ययावत उपचार पद्धतींनी सुसज्ज असलेल्या या हॉस्पिटलमुळे परिसरातील रुग्णांना अधिक चांगल्या व दर्जेदार वैद्यकीय … Read more

महिला बचत गटांसाठी मोठी संधी : पोकरा योजनेतून अवजार बँक स्थापनेसाठी 24 लाखांपर्यंत अनुदान

राज्यात 2026 हे महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आले असून महिलांना विविध कृषी योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा योजना) अंतर्गत महिला बचत गटांना अवजार बँक स्थापन करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. राज्यातील 21 जिल्ह्यांतील 7201 पेक्षा अधिक गावांमध्ये हा प्रकल्प राबविला … Read more

राज्यात शेतकरी कर्जमाफी योजनेबाबत मोठी हालचाल; नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश

राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. तसेच जे शेतकरी नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करत आहेत, अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांची माहिती प्रपत्र ‘अ’ च्या माध्यमातून संकलित करण्यात आली होती. आता नियमितपणे … Read more

पीएम किसान सन्माननिधी: 22वा हप्ता 13 मार्चला मिळणार? शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट

नवी दिल्ली : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना (PM-Kisan) अंतर्गत मिळणाऱ्या 22व्या हप्त्याबाबत मोठे अपडेट मिळाले आहे. प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांना लवकरच 2000 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 13 मार्च 2026 रोजी पीएम किसान उत्सव दिवस साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान सायंकाळी … Read more

खरीप पीक विमा 2025 आणि आंबिया बहार फळ पीक विमा 2024-25 : महत्त्वाचे अपडेट

राज्यातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून खरीप पीक विमा 2025 च्या प्रतीक्षेत होते. याबाबत कृषी विभाग आणि कृषिमंत्र्यांच्या माध्यमातून वारंवार आढावा बैठक घेण्यात आल्या होत्या. विविध शेतकरी संघटनांनीही निवेदन देऊन पीक विमा लवकर वितरित करण्याची मागणी केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर आता पीक विमा वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याची … Read more

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय : दोन लाखांपर्यंत पीककर्ज माफी जाहीर

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना” अंतर्गत महत्त्वाचा निर्णय घेत दोन लाख रुपयांपर्यंत पीककर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती देत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयानुसार ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या पीककर्जावर ही कर्जमाफी लागू होणार आहे. … Read more

पीएम किसान योजनेतील लाभासाठी ई-केवायसी व आधार सीडिंग अपूर्ण; हजारो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी तब्बल २ हजार ९८१ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप प्रलंबित असून, ३ हजार ८२७ शेतकऱ्यांचे आधार सीडिंग (DBT Enable) पूर्ण झालेले नाही, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे. ई-केवायसी व आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्यापासून वंचित राहावे … Read more

घरकुल लाभार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी: 190 कोटी रुपयांचा निधी मंजूर, 50 हजारांचा अतिरिक्त हप्ता मिळणार

ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत मंजूर घरकुलांचे अर्धवट बांधकाम निधीअभावी रखडले होते. मात्र आता शासनाने नवीन तीन शासन निर्णय (GR) जाहीर करून एकूण 190 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी 50,000 रुपये अतिरिक्त राज्य हिस्सा जमा होणार आहे. 📅 शासन निर्णयाचा तपशील … Read more