🔹 कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ?
भुईमूग उन्हाळी हंगामासाठी राज्यातील खालील ८ जिल्हे निवडले आहेत:
- कोल्हापूर
- सांगली
- सातारा
- नाशिक
- धुळे
- पुणे
- अहमदनगर (अहिल्यानगर)
- छत्रपती संभाजीनगर
या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना १००% अनुदानावर बियाणे मिळणार आहे.
🔹 अर्ज कुठे करायचा?
शेतकऱ्यांनी महाडीबीटी Farmer Scheme Portal वर “बियाणे व कीडनाशके” या घटकाखाली अर्ज करायचा आहे.
🔹 किती बियाणे मिळणार?
- जास्तीत जास्त मर्यादा: प्रति शेतकरी १ हेक्टरी (१५० किलो)
- कमी मर्यादा: २० गुंठे (३० किलो)
- १ एकर साठी: साधारण ६० किलो बियाणे
- उपलब्धतेनुसार २० किलो व ३० किलो पॅक देण्यात येतील. पॅक उपलब्धतेनुसार समायोजन केले जाईल.
🔹 100% अनुदान म्हणजे काय?
भुईमूग बियाण्याचा दर ₹114 प्रति किलो निश्चित आहे.
शेतकऱ्यांना हा पूर्ण खर्च सरकारकडून अनुदान म्हणून दिला जाईल. म्हणजेच शेतकऱ्यांना बियाण्यासाठी एक पैसाही भरावा लागणार नाही.
🔹 बियाण्याचा पुरवठा
प्रत्येक पात्र शेतकऱ्याला त्यांच्या अर्जानुसार व मर्यादेनुसार बियाणे देण्यात येणार आहेत.