अतिवृष्टी पूरग्रस्त 282 तालुक्यांसाठी मोठा निर्णय
राज्यात खरीप 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टी-पूरामुळे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने 26 नोव्हेंबर 2025 रोजी महत्त्वाचा निर्णय घेतला. बाधित शेतकऱ्यांचे अल्पमुदत पीक कर्ज मध्यम मुदतीत रूपांतर केले जाईल तसेच पीक कर्ज वसुलीला 1 वर्षाची स्थगिती देण्यात आली आहे. हा निर्णय राज्यातील 29 जिल्ह्यांतील 282 बाधित तालुक्यांना लागू राहील. या तालुक्यांतील सर्व गावांतील शेतकऱ्यांना ही सवलत मिळणार आहे. राज्यस्तरीय बँकर समितीला तात्काळ अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत.