सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, मक्याच्या कापणी अहवालाची प्रतीक्षा
खरीप 2025 साठी शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार का, हे आता फक्त पीक कापणीच्या अंतिम अहवालावर ठरणार आहे. मूग, उडीद, बाजरी, मका यांचे प्रयोग पूर्ण झाले असून आकडेवारी 15 नोव्हेंबरपासून कृषी आयुक्तालयाला पाठवली जात आहे. सोयाबीनची अंतिम आकडेवारी 15 डिसेंबरपर्यंत पाठवली जाणार असून त्यानंतर शासन ती विमा कंपनीकडे 31 डिसेंबरपर्यंत सुपूर्द करणार आहे. ज्या जिल्हे व तालुक्यांमध्ये उत्पादन उंबरठ्यापेक्षा कमी राहील, त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळू शकतो. कापूस व तुरीचे प्रयोग फेब्रुवारीपर्यंत चालणार आहेत.